Students new security guidelines: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांसोबत अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. मग ते बदलापूर येथील शाळेतील मुलीचे लैंगिक शोषण असो किंवा बसमध्ये शालेय विद्यार्थिनीसोबत विनयभंगासारख्या घटना असोत, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य सरकारकडून आता पूर्वनियोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे आणि त्यांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी केली जाईल.
हे नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या या निर्णयात असेही म्हटले आहे की, चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेस चाचणी होणे आवश्यक आहे.
हे पण वाचा » सेंट्रल बँकेत ४५०० पदांसाठी भरती: पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!
यापुढे अनधिकृत व्यक्तींना शालेय बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, जे पालक आपल्या मुलांना खाजगी वाहनांमधून शाळेत पाठवतात, त्यांनी चालकाची संपूर्ण ओळख आणि त्याची पार्श्वभूमी शाळेला कळवणे बंधनकारक आहे. पालकांनी चालकाची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी आणि त्याची पार्श्वभूमी तपासून घ्यावी.
यामध्ये चालकाच्या बेपर्वा ड्रायव्हिंगबद्दल किंवा भूतकाळातील अपघातांबद्दल काही माहिती असल्यास, ती देखील जाणून घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी खाजगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या पालकांनी चालकाची पडताळणी करून त्याची संपूर्ण माहिती शाळा व्यवस्थापनाला देणे आवश्यक आहे.