SBI cuts home loan interest rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात (RBI Repo rate) ५० बेसिस पॉइंट्सनी कपात केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी त्यांच्या कर्जाच्या व्याजदरांमध्ये घट केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) देखील आपल्या गृहकर्ज (Home Loan) आणि इतर कर्ज योजनांचे व्याजदर कमी केले आहेत.
याआधी, १२ जून रोजी बँक ऑफ बडोदाने देखील गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजदर कपात केली होती. रेपो दरात घट झाल्यामुळे बँकांना आरबीआयकडून कमी दराने निधी मिळतो, त्यामुळे बँकांकडून ग्राहकांना व्याजदरामध्ये सवलत देण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट: https://sbi.co.in/ वर पाहू शकता.
SBI चे नवीन कर्ज दर कधीपासून लागू?
एसबीआयने जाहीर केलेले नवीन कर्ज दर १५ जून २०२५ पासून लागू होतील. यामध्ये बँकेने गृहकर्ज, ईबीएलआर (EBLR), आणि टॉप-अप कर्ज योजनांचे दर कमी केले आहेत. मात्र एमसीएलआर (MCLR) मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
गृहकर्ज दर किती झाले आहेत?
एसबीआयचे गृहकर्ज दर हे ग्राहकांच्या CIBIL स्कोअरवर आधारित असतात. यामध्ये खालीलप्रमाणे दर निश्चित झाले आहेत. हे नवीन दर १५ जूनपासून लागू होतील.
• सामान्य गृहकर्ज व्याजदर: ७.५०% ते ८.४५%
• मॅक्सगेन ओव्हरड्राफ्ट गृहकर्ज दर: ७.७५% ते ८.७०%
• टॉप-अप गृहकर्ज दर: ८.००% ते १०.५०%
हे पण वाचा » ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी अपडेट!
SBI गृहकर्ज ईबीएलआरशी का जोडले जातात?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची गृहकर्जे बाह्य बेंचमार्क कर्ज दर (EBLR) शी जोडलेली असतात. EBLR हा एक असा दर आहे ज्यावर बँका त्यांचे फ्लोटिंग व्याजदर निश्चित करत असतात. नुकतेच, एसबीआयने आपला EBLR ८.६५% वरून ८.१५% पर्यंत कमी केला आहे.
EBLR दराच्या आधारेच बँका गृहकर्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) कर्जासह विविध फ्लोटिंग कर्जासाठी व्याजदर ठरवते. प्रत्येक व्यक्तीसाठी व्याजदर त्यांच्या सिबिल (CIBIL) स्कोअर, कर्जाचा कालावधी आणि इतर घटकांवर अवलंबून असू शकतो. म्हणजेच, ज्यांचा क्रेडिट स्कोर चांगला आहे त्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते.
हे पण वाचा » LIC हाऊसिंग फायनान्समध्ये 250 जागांसाठी भरती सुरु!
रेपो रेट कपातीचा अर्थ काय?
ज्याच्या आधारे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) व्यावसायिक बँकांना कर्ज त्याला रेपो रेट असे म्हणतात. जेव्हा आरबीआय रेपो दरात कपात करते, तेव्हा बँकांना मध्यवर्ती बँकेकडून कमी दराने निधी मिळतो. याचा थेट फायदा असा होतो की बँका ग्राहकांना स्वस्त दरात गृहकर्ज आणि इतर किरकोळ कर्जे देऊ शकतात. यामुळे नागरिकांना कर्ज घेणे अधिक परवडणारे होते.